रतनगड

                                         रतनगड

                                 रतनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
रतनगड
Ratangad nedhe.jpg
नावरतनगड
उंची४३०० फुट
प्रकारगिरिदुर्ग
चढाईची श्रेणी
ठिकाणरतनवाडी, ता- अकोले
जवळचे गावरतनवाडी
डोंगररांगपश्चिम घाट
सध्याची अवस्था
स्थापना{{{स्थापना}}}

भौगोलिक स्थान

अकोले तालुका १९.३२ उ ७३.१८पु समुद्रसपाटीपासुन उंची-३५२३फुट

कसे जाल ?

गडावर जाण्यासाठी पायथ्याशी रतनवाडीला पोहचायला हवे. रतनवाडीस संगमनेरहुन अकोले-राजुर-भंडारदरामार्गे जाता येते.

इतिहास

१७६३ साली हा किल्ला कोळी सरदार जावजी याने ताब्यात घेतल्याची गॅझेटमध्ये नोंद आढळते. १८१८ साली रतनगड पाच विभागांचे मुख्यालय होते. राजुरची ३६ खेडी, अलंगची २२ खेडी ही सह्याद्रीच्या वरची व सह्याद्रीच्या खालची सोकुर्ली परगण्याची ६० खेडी, वाडी परगण्याची २२ खेडी, जुरुश्रोशि परगण्याची ६० खेडी होती. १८२० मध्ये कॅप्टन गॉर्डनने गड ताब्यात घेतला. १८२४ साली तो आदीवासी सेनानी रामोजी भागंरेनी गड ताब्यात घेतला.
पुराणात असा ऊललेख आहे समुद्र मंथन झाल्या वर देव आणि दानव यांच्या मध्ये समुद्रातून निघालेल्या अमृताची वाटणी करण्याचे ठरले व नेवासे या ठिकाणी देवांनी अमृत प्राशन कले त्याच पंक्ती मधे राहू नावाचा एक दानव असून त्याने अमृत प्राशन केलेले आहेस असे समजताच विषणुने मोहीनी रुप धारण करून त्या दानवाचा शिरछेद केला त्याचे धड राहूरी या ठीकाणी पडले तर शीर रतनगडावर पडले व त्याच्या कंठातील अमृताची धार गडावरुन वाहू लागली त्या काळा पासून त्या धारेचे नदी मध्ये रुपांतर झाले व नदीस अमृत वाहीनी असे नाव पडले.

छायाचित्रे

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

गडावरील प्रेक्षणीय ठिकाणे -
  • १ - गणेश दरवाजा.
  • २ - रत्ना देवीची गुहा. (मंदिर)
  • ३ - मुक्कामाची गुहा.
  • ४ - प्रमुख दरवाजा. (यावर देवादिकांची शिल्पे पहावयास मिळतात)
  • ५ - इमारतींचे जोते. (गडावर वास्तव्याला असलेल्या जुन्या भग्न इमारतींचे अवशेष)
  • ६ - कडेलोट पॉइंट.
  • ७ - राणीचा हुडा (भग्न बुरूज)
  • ८ - प्रवरेचे उगमस्थान.
  • ९ - मोर्च्याची ठिकाणे आणि बुरूज.
  • १० - अंधार कोठी व त्यातील पाण्याचे तले. (यातील पाणी हे अतिशय मधुर असून पिण्यास योग्य आहे )
  • ११ - नेढ़ (गडावरील अत्युच्च ठिकाण, खडकाला असलेले आरपार भगदाड.)
  • ११ - कल्याण दरवाजा. (यालाच साम्रद,कोकण किंवा त्रिम्बक दरवाजा असेही म्हणतात.)

गडावरील राहायची सोय

गडावर रहाण्याच्या सोईसाठी दोन गुहा असून पाण्याची उपलब्धता आहे. गडावरील गुहांमध्ये अंदाजे ३० ते ३५ लोक राहू शकतात.

गडावरील खाण्याची सोय

गडावर खान्याची सोय नाही. स्वताला ती व्यवस्था करावी लागते.

गडावरील पाण्याची सोय

गडावरील पाण्याची टाके आहेत. त्यातील काही पिण्यायोग्य आहेत. कल्याण दरवाज्याजवळील झरा सुमधुर आहे.

गडावर जाण्याच्या वाटा

गडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत. १ रतनवाडीहुन २ कुमशेतहुन शिवकालीन मार्गाने ३ साम्रदहुन

मार्ग

मुंबईहून इगतपुरी-घोटी मार्गे भंडारदरा धरणाला वळसा घालून रतनवाडीला पोहचता येते.
रतनवाडीला पोहचण्यासाठी अकोले-रतनवाडी बस सुविधा आहे. परंतु ती सोयीची नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ

रतनवाडीतून गडावर पोहचण्याकरिता ३ तास लागतात.

संदर्भ

No comments:

Post a Comment